येस न्युज मराठी नेटवर्क । राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असुन, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आलेला आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सूचक इशारा दिलेला आहे. आज(शनिवार) दिवसभरात राज्यात ८८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, १५ हजार ६०२ नवीन करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.
याशिवाय आज ७ हजार ४६७ रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.४९ टक्के एवढे झाले आहे.