• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सिद्धेश्वर तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृती आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी

by Yes News Marathi
May 21, 2025
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर तलावाच्या पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी कृती आराखडा सादर करावा – जिल्हाधिकारी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सार्वजनिक बांधकाम विभागाने इरिएशन ट्रीटमेंटच्या माध्यमातून पाण्याची शुद्धता करण्याचा प्रस्ताव करून 15 जून पर्यंत कार्यारंभ आदेश द्यावेत

*तलावातील पाण्याचा पीएच कमी झाल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन मासे व कासव यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती

सोलापूर, दिनांक 20 – मागील दहा-पंधरा दिवसात सिद्धेश्वर तलावातील मासे व कासव यांचा काही कारणामुळे मृत्यू होत असल्याची बाब निर्देशनास आली. तलावातील पाण्याचा पीएच कमी झाल्याने पाण्यातील जीवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरी तलावातील पाण्याची शुद्धता व गुणवत्ता वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका एजन्सीची नियुक्ती करून कृती आराखडा सादर करावा व ते काम सुरू करण्याचे आदेश 15 जून 2025 पर्यंत द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सिद्धेश्वर तलावातील मासे व कासव यांच्या मृत्यूच्या कारणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, रवी पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, नगर अभियंता सारिका अंकुलवार, सार्वजनिक अभियंता वेंकटेश चोबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटन विकास अंतर्गत सिद्धेश्वर तलावातील पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती करावी. इरिएशन ट्रीटमेंट च्या माध्यमातून पाण्याची शुद्धता करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे ज्यामुळे मासे कासव व अन्य जलजीवांना धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी एक कृती आराखडा सादर करून 15 जून 2025 पर्यंत त्याचे काम सुरू होईल याची खात्री करावी असेही त्यांनी सुचित केले.


प्रारंभी या बैठकीत मागील काही दिवसापासून शुद्धेश्वर तलावातील मासे व कासव मृत्यू होत असल्याची घटना निर्देशनास आली होती. त्यांच्या मृत्यूचे कारणांची चर्चा होऊन पाण्याची अमलता वाढल्याने मासे व कासवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बैठकीत देण्यात आली

Previous Post

वैशपायन स्मृती शासकीय महाविद्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा…

Next Post

शहर गुन्हे शाखेकडून, एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त…

Next Post
शहर गुन्हे शाखेकडून, एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त…

शहर गुन्हे शाखेकडून, एकुण ६,७९,६२०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group