पंढरपूर : आपल्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. ही गरज ओळखून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील शिवशंभू संघटनेच्या पदाधिका-यांनी अयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचं उदघाटन अभिजीत पाटील यांनी करून स्वतः रक्तदान केलं. आधी केलं आणि मग सांगितले या म्हणीप्रमाणेच अभिजीत पाटील यांची ओळख आहे. सहकार क्षेत्र असो वा सामाजिक कार्य त्यात प्रथम प्राधान्य देणारे आहेत. तरूण युवकांची मोठ्या प्रमाणात फळी असून अभिजीत पाटील यांची क्रेजच झाली आहे. पाटील म्हणाले की कोरोनाचा काळ सुरू आहे. तरूण युवकांनी पुढं येऊन रक्तदान करावं हे अवाहन हि केलं. यावेळी गावातील मंडळी उपस्थित होती.
