सोलापूर शहर जिल्ह्यातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश
सोलापर,दि.०८ (प्रतिनिधी)राज्यात येत्या काहि दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणका होणार आहेत त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणक होणार आहे, या सर्व निवडणका मनसे लढवणार असन सर्वांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन सोलापर येथील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे नेते दिलीपबाप धोत्रे यांनी केले,,यावेळी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो यवकांनी प्रवेश केला.
राज्यभरात मनसेकडन मेळावे आयोजित केले जात आहे,सोलापर येथील उषा लॉन्स मंगल लॉन्स मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील तीन पक्ष्याच्या म.हाविकास आघाडी सरकारने आणि केंद्रातील भाजपा सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडन दिले, या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून सामान्यांना काहीच दिलासा मिळाला नाही, फायनान्स कँपन्या आणि बँकेकडून होणाऱ्या छळवणक बाबत सरकारने काहीच केले नाही, महावितरणकड़न अनेक घरगती तसेच शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्यावर ही सरकार कड़न शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला नाही.केंद्र सरकारने देखील कोणतेही मदत केली नाही,खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागले याबाबत देखील केंद्र राज्य सरकारने काही केले नाही असे धोत्रे म्हणाले. त्यामुळे येत्या निवडणकीत जनता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कोरोनाच्या काळात संपर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली, पूरग्रस्तांना मदत केली त्यामळे जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला, यावेळी प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे,जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अप्पा करचे, शहर अध्यक्ष उपाध्यक्ष सत्तार सय्यद,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी , महिला अध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ,तसेच जिल्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.