पुणे: राज्यातील काही भागात 28 तारखेपर्यंत पाऊस घेणार विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. मात्र, कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल.
28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल.मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.राज्यामध्ये जून ते जुलै या दोन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आता 34 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला असला तरी मध्य भारतात मात्र महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडल्याचे नोंदीवरून समोर येत आहे.