नवी दिल्ली : पेगॅसस मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पेगॅससच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ झाला. यावेळी विरोधकांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप केला. पावसाळी अधिवेशनाचा आठव्या दिवशीही गोंधळाचे वातावरण होते .
लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्याप्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले.देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येक पक्षाचा नेता आहे. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. सरकारने पेगॅसस विकत घेतले की नाही?, हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आपल्या लोकांविरोधात पेगॅससचा वापर केला की नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. आम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे आहे. पेगॅससवर संसदेत कोणतीही चर्चा होणार नाही, असे सरकारने आम्हाला स्पष्ट सांगितले आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.