सांगली : “सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होते , अनेकांच्या घरात पाणी गेले तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारच. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“काही ठीकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठीकाणी पुनर्वसन करावे लागेल. त्याची तयारी ही तुमची सगळ्यांची असली पाहीजे. पाण्याच्या पातळ्या मोजण्यासाठी आपले आयुष्य नाही आहे. सरकारकडून तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. येवढे वचन मी तुम्हाला देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिलवडीतील नागरिकांना सांगितले.
मला थोतांड येत नाहीत
यावेळी उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केली, “ते म्हणाले आतापर्यंतची आपली प्रथा आहे. संकट आल्याबरोबर हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करतात. मात्र, ते पॅकेज कुठं जातं कुणालाचं माहीत नाही. मला असे थोतांड येत नाहीत. मी प्रमाणिकपणे मदत करणार आणि ती केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.