येस न्युज मराठी नेटवर्क : “सर्व सामान्यांची जीवनशैली उंचावण्यावर या अर्थसंकल्पात जोर देण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सर्वच क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल आणणार आहे. मी यासाठी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन व त्यांचे सहकारी अनुराग ठाकूर व त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. हे आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर तसेच विकास आणि विश्वासाचं बजेट आहे.” अशा शब्दांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“असा अर्थसंकल्प पाहायला कमीच मिळतो, ज्यामध्ये सुरुवातीच्या एक दोन तासांमध्येच एवढ्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना असं वाटत होतं की, सरकार सामान्य जनतेवरचा भार वाढवेल. मात्र आमच्या सरकारने सातत्याने प्रयत्न केला आहे की, अर्थसंकल्प पारदर्शक असायला हवा. मला आनंद आहे की, आज अनेक तज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाच्या पारदर्शकतेचे कौतुक केले.” असंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं.