• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्धव ठाकरे-फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

by Yes News Marathi
July 30, 2021
in इतर घडामोडी
0
उद्धव ठाकरे-फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध भागांचे दौरे करत आहेत. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली.

यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले. कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहुपुरीतच थांबले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे आता विविध राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.या भेटीबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांता निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरे होईल. मुख्यमंत्र्याचा अशाप्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली. यावेळी परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, असे फडणवीस म्हणाले असल्याची माहिती दरेकरांनी दिली.

Previous Post

अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार

Next Post

केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

Next Post
केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group