सोलापूर – दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलींचे नातेवाईक आणि स्थानिक करत आहेत .सोलापुरातील मोदी परिसरात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही घटना आहे .भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) ही मृत मुलींची नावे आहेत . जयश्री महादेव म्हेत्रे (18) तिची तब्येत गंभीर आहे .सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली .यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . ज्या मुलींचा मृत्यू झालाय त्या कुटुंबियांच्या भेटीला खासदार प्रणिती शिंदे पोहोचल्या आहेत.
मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे .भाजप आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे