मुंबई : सर्व जिल्ह्यांना तसेच महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. राज्यात आजपासून पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमिवर व्यापारी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले असून अत्यावशक सेवा आणि दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत काहीही केले तरी दुकानं उघडणार असल्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागपूरमध्येही व्यापारी संघटनांनी आक्रमक निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.