येस न्युज मराठी नेटवर्क ; केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा हवाला देत गडकरी यांनी ही गोष्ट करोना महामारीपेक्षाही गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांच्या घटनांबाबत काळजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले,”रस्ते अपघातात देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते,” असं गडकरी म्हणाले.