• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या या IAS अधिकाऱ्याचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार गौरव

by Yes News Marathi
January 24, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूरच्या या IAS अधिकाऱ्याचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार गौरव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : आसाम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पंढरपूरचे नितीन खाडे यांनी आसाम राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली आहे. खाडे यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांना दिल्ली येथे खास कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.

आसाममध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक काळात मतदारांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा गांभीर्याने विचार करून खाडे यांनी यंत्रणा राबवली.

कोविड सह अनेक आव्हाने समोर असताना देखील खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि काटेकोरपणे यंत्रणा राबवली. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविड च्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली य़ेथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे…

  • 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.
  • कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टकके ने वाढले. मतदानावेळी कोविड च्य़ा अनुषंगाने सर्वती काळजी घेण्यात अाली.
  • मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील कोणाचाही मृत्यू झाला नाही.
  • निवडणूक निष्पक्ष आणि सुरक्षित पार पाडली गेली.

Previous Post

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही – आदित्य ठाकरे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड

Next Post
आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड

आमदार प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय स्टार प्रचारकपदी निवड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group