
सोलापूर शहर आणि जिल्ह्याने गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि महापुराचा सामना केला. यंदाच्या वर्षी कुठेही पाणीटंचाई जाणवणार नाही अशी शक्यता सध्या तरी आहे. पाण्याची टंचाई नसल्यामुळे शेतशिवार पिकांनी बहरून आला आहे. द्राक्ष, केळी,आंबा, चिक्कू या फळबागा फळांनी लगडून गेल्या आहेत. ज्वारी, गहू,हरभरा ही पिके देखील जोमात असून अनेक ठिकाणी काढणीला वेग आला आहे तर काही शेतात ही पिके डोलत आहेत. बळीराजा हिरवी स्वप्ने पाहत असतानाच अवकाळी पावसाचे टेन्शन कालपासून निर्माण झाले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच वाहणारी सुसाट वारे शेतकऱ्यांना धडकी भरणारी आहे. तापमानात मोठी घट झाली असून काही ठिकाणी अवकाळी सरी पडू लागल्या आहेत . आधीच कवडीमोल भावाने विकला जाणारा भाजी भाजीपाला.. कांद्याचे ढासळलेली दर आणि उसाची कारखानदारांनी अडवलेली दिले अशा संकटात शेतकरी सापडला असताना पुन्हा या अवकाळी पावसाचे टेन्शन नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

