• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 24, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा विधी व न्याय विभागाकडे पाठविला

by Yes News Marathi
August 26, 2021
in इतर घडामोडी
0
विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा विधी व न्याय विभागाकडे पाठविला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : विठ्ठल मंदिराचा हा विकास आराखडा पुरात्त्व विभागाकडून मंजूर होऊन मंदिर समितीकडे आला होता. मंदिर समितीनेही या आराखड्याला मान्यता देऊन राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. आता 700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे स्वरूप पुरातत्व विभागाच्या मदतीने दिले जाणार आहे. या विकास आराखड्यात सर्वात महत्वाचा बदल नामदेव पायरी महाद्वार येथे होणार असल्याची माहिती पुढे येत होती.

नामदेव पायरी जवळील महाद्वार हे अलीकडच्या काळात बनविले गेल्याने तेथे आर सी सी पद्धतीचे बांधकाम केलेले आहे. आता हे काढून या ठिकाणी संपूर्ण पुरातन दगडी बांधकामात महाद्वार उभारायची योजना होती . मात्र ही जागा अतिशय महत्वाची असून येथे संत नामदेव यांच्या कुटुंबातील 13 सदस्य आणि जनाबाई अशा 14 जणांच्या संजीवन समाधी आहेत. मंदिराचा हा विकास आराखडा करताना या समाधीला धक्का लागण्याची शक्यता असल्याने आता सध्याचे महाद्वाराची खालची बाजू तशीच ठेऊन त्यावर दगडी क्लॅडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महाद्वाराच्या वरचा भाग मात्र पडून तेथे दगडी बांधकामात 6 शिखरे केली जाणार असल्याचे मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर सांगतात . विठ्ठल मंदिर आराखडा राबविताना वारकरी संप्रदायाला विश्वासात घेण्याची मागणी देखील वारकरी संतांकडून केली जात आहे. विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे स्वरूपात पाहणे हे वारकरी संप्रदायाची अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र नामदेव पायरी पासून विठ्ठल गाभाऱ्यापर्यंत जे बदल होणार आहेत. ते संप्रादयाला विश्वासात घेऊन करण्याची मागणी राणा महाराज वासकर यांनी केली आहे. या विकास आराखड्यात संत नामदेव महाद्वाराबाबत आम्ही उत्सुक असून येथे होणारे बदल कसे असणार याची माहिती आम्हाला समजावी अशी मागणी नामदेवांचे 17 वे वंशज असणारे राम महाराज नामदास यांनी केली आहे.
एकंदर 62 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविला जाणार असला तरी यासाठी सर्वात मोठा प्रश्न हा निधीचा आहे. गेल्या दीड वर्षांपासून विठ्ठल मंदिर बंद असल्याने जवळपास 60 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे . आता हा विकास आराखडा राबविण्यासाठी राज्यभरातील विठ्ठल भक्तांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीच्या महापूजेला आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्यास मंजुरी आणि निधीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते .

Previous Post

जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय; मुख्यमंत्र्यांचा राणेंना सूचक इशारा

Next Post

सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली कोट्यवधीच्या विकास कामांची मागणी

Next Post
सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली कोट्यवधीच्या विकास कामांची मागणी

सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली कोट्यवधीच्या विकास कामांची मागणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group