पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील घोषणा पत्रकार परिषद घेत केली आहे. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरुन 55 टक्क्यांवर पोहोचला आहे.
केंद्र सरकार महागाई भत्ता वाढीसंदर्भात घोषणा केली आहे. याचा फायदा केंद्राचे कर्मचारी अन् पेन्शनर्स मिळून 1 कोटी लोकांना फायदा होणार आहे. महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवणं ही गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी वाढ ठरली आहे.