मुंबई : राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेचत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ऑफलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी मुलं रस्त्यावर उतरली असताना कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलय. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाबाबत वेट अन्ड वॉचची भूमिका असून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायचा की नाही? ते त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवलं जाईल, असाही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलाय.