उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे.
अर्थसंकल्प म्हटले की सर्वांना अजित पवार यांची आठवण येत असते.परंतु यंदा मात्र अजित पवारांची उणीव भासणार आहे.विरोधी पक्षनेता पद न दिल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घातला असून मंत्री नरहरी झिरवळ यांच्या पीएचे लाच प्रकरण, अजित दादांच्या विमान अपघाता प्रकरणी घातपाताचा संशय आणि सरकारची संदिग्ध भुमिका अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
