• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के

by Yes News Marathi
August 3, 2021
in इतर घडामोडी
0
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्य मंडळातर्फे बारावीचा निकाल मंगळवारी (३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. करोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य मंडळाला पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
तक्रारींच्या निराकरणासाठी..
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
कुठे पाहाल निकाल
https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा
सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे.
१३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापू, अमरावती, नाशिक, लातूर आणइ कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्यव एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात येत करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल यांनी निकाल जाहीर केला आहे.
शाखेनिहाय निकाल
विज्ञान शाखा – ९९.४५ टक्के
कला शाखा – ९९.८३ टक्के
वाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ९८.८० टक्के
State Board XII result is 99.63 percent

Previous Post

सांगोला येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

महाराष्ट्रातील एका विद्यापीठासह देशातील २४ विद्यापीठे बोगस

Next Post
महाराष्ट्रातील एका विद्यापीठासह देशातील २४ विद्यापीठे बोगस

महाराष्ट्रातील एका विद्यापीठासह देशातील २४ विद्यापीठे बोगस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group