स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
शाळांमध्ये 75 वृक्ष लागवड अभियानचा शुभारंभ
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महिला ग्रुप ,महा एनजीओ फेडरेशन व माया केयर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शाळांमध्ये 75 वृक्ष लागवड अभियानचा शुभारंभ विकास नगर येथील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला मैदानावर करण्यात आला.
चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला मैदानावर वड, पिपळ, पेरू, आंबे असे विविध फळ झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त विविध शाळांमध्ये 75 वृक्षारोपण करून पर्यावरण राखण्याचा संदेश देण्यात येत आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काबरा टेक्स्टाईलचे प्रमुख विठ्ठल काबरा, सामाजिक कार्यकर्ते आकाश लखोटीया, चंद्रभागा यलगलवार प्रशालेचे मुख्याध्यापक नरसिंह आसादे, जेष्ट नागरिक भामाबाई चव्हाण, रेणुका धानेश्वर श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महिला ग्रुपचे अध्यक्ष अक्षता कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. वृक्ष लागवड करत त्याची जोपासना करायची गरज असल्याचे आवाहन मान्यवरांनी केले. सुत्रसंचालन सारिका मदने यानी केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कासट, रविंद्र गोयल, दिनेश मंत्री, दिपक बुलबुले, श्लोक सक्करगी, शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, अर्चना बंडगर, सुजाता सक्करगी, भारती जवळे, प्रियंका जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.