मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच रिक्षा-टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार आहेत. माजी मंत्री उदय सामंत, माजी महापौर नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हे महामंडळ तयार करण्याची जबाबदारी असेल. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रिक्षावाला, पानटपरीवाला, वॉचमन अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर म्हणून या घटकांची प्रगती करण्यासाठी महामंडळ आणि योजना सुरु करणार आहे.
- कसं असणार रिक्षा-टॅक्सी महामंडळ?
- परिवहन किंवा कामगार विभागाच्या अंतर्गत महामंडळ स्थापन करणार
- राज्यात साडेआठ लाख रिक्षा आहेत
- तर 1 लाख 20 हजार टॅक्सी आहेत
- 60 वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन मिळणार
- महिलांना प्रसुतीसाठी मदत केली जाणार
- चालकांसाठी वेगळे हॉस्पिटल असणार
संजय राऊत काय म्हणाले होते?
“गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील,” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दहिसर इथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केली होती. “संदिपान भुमरे यांना पहिलं तिकीट मिळालं तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचं तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट दिलं होतं,” असं राऊत म्हणाले.