• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली महाराष्ट्रात

by Yes News Marathi
December 1, 2020
in मुख्य बातमी
0
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली महाराष्ट्रात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात पोहचू लागली आहे. आज, मंगळवारी नगर जिल्ह्यातील राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्तावर उतरून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. राहुरी तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा, यासाठी आंदोलन केल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

याप्रसंगी रविंद्र मोरे म्हणाले, ‘गेल्या सहा दिवसांपासून लाखों शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न चालवला आहे. पण शेतकरी केंद्र सरकारला भीक घालणार नाही. पंतप्रधानांना देशभर भाषणे करायला वेळ आहे, इव्हेंट करायला वेळ आहे. पण अन्नदात्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण ताकदीनीशी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. या आंदोलनावर व कृषी विधेयकावर केंद्र सरकारने तीन दिवसात तोडगा काढला नाही, तर महाराष्ट्रातही या आंदोलनाचा मोठा भडका उडेल,’ असा इशारा त्यांनी दिला

Previous Post

सत्तेच्या स्वार्थासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र – उदयनराजे भोसले

Next Post

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी – भाविक वारकरी मंडळ

Next Post
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी – भाविक वारकरी मंडळ

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी - भाविक वारकरी मंडळ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group