• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही

by Yes News Marathi
September 30, 2023
in मुख्य बातमी
0
कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : “जळगावात तहसीलदार, नायब तहसीलदारांची पदभरती कंत्राटी तत्त्वावर होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही. या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं स्पष्टीकरण जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलं आहे.

एकीकडे आधीच कंत्राटी पद्धतीने पद भरती करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती, अशातच जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. परंतु कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदारांची भरती होणार असल्याची बातमी खोटी असल्याचं तहसीलदार म्हणाले.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, “जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेमार्फत ही जाहिरात निघाली होती. अशा प्रकारच्या जाहिराती वेळोवेळी निघत असतात. कोणत्याही प्रकारच्या भूसंपादन प्रक्रियेत आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळ लागत असते. जे आपण त्या ठराविक कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावरती घेत असतो. यामध्ये आपणास टायपिंगचे काम करणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेविषयी संपूर्णपणे माहिती असलेले तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. ज्यांना महसूल प्रशासनाच्या भूसंपादन प्रक्रियेचा अनुभव आहे, अशा व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये या तज्ज्ञ व्यक्तींची निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती केली जाते. या व्यक्तींना ठराविक कालावधीपुरते कंत्राटी घेतलेले जात असते‌. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात येत असते. कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्याच्या कालावधीसाठी या व्यक्तींची कंत्राटी सेवा घेतली जाते. या कालावधीमध्ये ते भूसंपादनाची प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहाय्य करतात. या पदावरील व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र कार्यालय नसते. ते कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र निर्णय घेत नाहीत. त्यांच्या अंतर्गत कोणतेही कर्मचारी कार्यरत नसतात.

Previous Post

विकासनगर सोसायटी तर्फे ” प्रश्न मंजुषा ” स्पर्धा

Next Post

ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ सुरू

Next Post
ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ सुरू

ॲबिलिटी प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ सुरू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group