• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 5, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सांगलीत पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम

by Yes News Marathi
July 25, 2021
in इतर घडामोडी
0
सांगलीत पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : सांगलीमध्येही पावसाने उसंत घेतली तरी सांगली शहरासह वाळवा, मिरज, पलूस, शिराळा तालुक्यांतील १०४ गावांची महापुराशी झुंज चालू आहे. सांगलीमध्ये पाण्याची पातळी ५२ फुटांपर्यंत जाऊन स्थिरावण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाचा अंदाज चुकला असून नागरिकांची धावपळ सुरु आहे. आतापर्यंत लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

नदीकाठच्या बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून पूरबाधित क्षेत्रातील समस्या गंभीर बनली आहे.पाण्याची पातळी ५२ फुटांवर स्थिरावेल आणि ओसरेल असा अंदाज जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी वर्तवला होता. मात्र अद्यापही पाणी पातळीत वाढ सुरु आहे. यामुळे घरात थांबवलेल्या नागरिकांची ऐनवेळी पाणी आल्याने धावपळ सुरु झाली आहे. सध्या गणपती मंदिर, राजवाडा चौक, बस स्थानक, स्टेशन रोड, फौजदार गल्ली, शिवाजी पुतळा परिसरात पाणी आल आहे. नदीकाठच्या शेतात पाणी आल्याने २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल आहे.मिरज कृष्णा घाट, ढवळी, अंकली, इनाम धामणी, सांगलीवाडी, हरिपूचा संपर्क तुटला आहे. तर भिलवडी, ताकारी, औदुंबर येथे पाणी ओसरु लागले. पूराचे पाणी फुटांपर्यंत वाढले असून उतार मात्र कमी वेगाने होत आहे. आयर्विन पूलावर पाणी पातळी ५४ फूट १० इंचावर पोहोचली आहे. दरम्यान अलमट्टीचा विसर्ग साडेतीनवरुन अडीच लाख क्युसेक करण्यात आला आहे.गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र या अतिवृष्टीने नद्यांना आलेले पूर आणि त्यातच धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे सांगली आणि कोल्हापूरभोवतीचा पुराचा विळखा कायम आहे. दरम्यान, या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांसह स्थानिक प्रशासनाने मोठी मोहीम उघडत हजारोंना सुरक्षित स्थळी हलवले.

Previous Post

मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावरमुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, चिपळूणसह इतर पूरग्रस्त भागात करणार पाहणी

Next Post

ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना रोमांचित झालो : मोदी

Next Post
ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना रोमांचित झालो : मोदी

ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना रोमांचित झालो : मोदी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group