पुणे : राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालं आहे. पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची एक बैठक झाली त्यानंतर ओबीसी समाजाची एक बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राज्यसरकार केंद्र सरकारला जनगणना देत नाही हे चुकीचं आहे, याचा जनगणनेशी संबंध नाही. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर 26 जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.