येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. दरम्यान, नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीची घोषणा आज(रविवार) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली . करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच, लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.
करोनाचा धोका वाढतोय त्यामुळं नियमांचं पालन करा, मास्क न वापरल्यास १ हजार रुपये दंड भरावा लागणार, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.