• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नारायण राणे यांनी गिअर बदलला

by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
नारायण राणे यांनी  गिअर बदलला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी त्यांच्याकडं देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळताच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे.
शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. पद लहान असो की मोठे, राणेंची कामाची पद्धत नेहमीच धडाकेबाज राहिली. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसचा आधार घेतला. तिथं अपेक्षित न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंचे राजकारण संपल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली आहे.अतिवृष्टीनंतर कोकणात आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला बसला. चिपळूण शहर पाण्याखाली गेले तर महाडमध्ये दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली. केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणेंनी दोन्ही ठिकाणचा दौरा केला. मंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी लोकांना धीर दिलाच, पण पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री व राज्य सरकारवर टीका करून लक्ष वेधून घेतले .शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरे हे नारायण राणे यांचे लक्ष्य राहिले आहे. काँग्रेसमध्ये असतानाही ते शिवसेनेच्या कारभारावर व उद्धव ठाकरे यांच्यावर तोफा डागतच होते. आता केंद्रीय मंत्रिपदी आल्यानंतर टीकेची ही धार अधिक तीव्र झाली आहे. महाड येथील दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना राणेंनी राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेतून त्याची चुणूक दिसली. ‘सरकार आहेच कुठे ? सरकारचा कोणताही माणूस लोकांना भेटत नाही. आता कुठे मुख्यमंत्र्यांना घरातून डिस्चार्ज मिळालाय, आता फिरायला लागलेत,’ असे ते म्हणाले. त्यातून राणे यांनी आपली दिशा स्पष्ट केली.पद असो वा नसो, नारायण राणे यांनी राजकारणात आपला दरारा कायम राखला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यामुळं शिवसेनेत राणे फॉर्मात होते. शिवसैनिकांमध्येही त्यांचा धाक होता. शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळाले खरे , मात्र त्याचा पूर्वीचा जोष दिसत नव्हता. आता भाजपमध्ये केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानं राणेंनी पुन्हा ‘कार्यपद्धतीचा गिअर’ बदलल्याचे दिसत आहे. याची प्रचिती चिपळूणमध्ये आली. चिपळूणमध्ये त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते व सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले प्रवीण दरेकर यांनाच बोलताना गप्प केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. राणे आता याच स्टाइलने पुढे जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी बाबत जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार बैठक

Next Post

भारताकडून पदकांची लयलूट होणार

Next Post
भारताकडून पदकांची लयलूट होणार

भारताकडून पदकांची लयलूट होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group