येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईची कोरोनामुळे होणारी मृत्यूसंख्या सातत्याने दडवण्याचे काम होत असल्याचे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत सातत्याने करोना चाचण्या कमी होत असून त्यातही आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असून राज्यातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अद्ययावत झाल्यानसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात हा मृत्यूसंख्या दडण्याचा आरोप केला आहे.
मुंबईत रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.