• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर मुंबई निवडणुकीची धुरा?

by Yes News Marathi
August 7, 2021
in इतर घडामोडी
0
आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर मुंबई निवडणुकीची धुरा?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेने नाशिकची महापालिका निवडणुकीची सूत्रे अमित ठाकरे यांच्याकडे सोपवल्यानंतर आता शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईचा गड राखण्याची जबाबदारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या निमित्ताने आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचं, अशी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणं हे शिवसेनेपुढे आव्हान असणार आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने साहजिकच निवडणुकीचे व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड व प्रचाराच्या बाबतीत त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळं या सर्व जबाबदाऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकड पर्यावरण व पर्यटन खाते असून ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये लक्ष घालणं सुरू केलं आहे. मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न असो, आदित्य ठाकरे हे स्वत: ही कामे करून घेत आहेत. नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यामुळं महापालिका निवडणुकीची सूत्रे त्यांच्यात हाती असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Previous Post

राज कुंद्राची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Next Post

भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी

Next Post
भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी

भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group