• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 10, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोदींचा शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक

by Yes News Marathi
July 7, 2021
in मुख्य बातमी
0
मोदींचा शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जात आहे.नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या चौघांना संधी देण्यात येत आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत कोकण पट्ट्यातील शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले असल्याचे दिसत आहे.

नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद दिल्याने भाजपची कोकण किनारपट्टीवर ताकद वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.कोकणात एकूण 11 खासदार आणि 66 आमदार येतात. यात आगरी कार्ड राजकारण खेळायला भाजपने सुरवात केली आहे. शेकापचे शिक्षक आमदार बलराम पाटील यांच्या मागे कारवाईचा सिसेमेरा सुरू असून तिकडे शेकाप जयंत पाटील आर्थिक अडचणीत आहेत. नारायण राणे यांना मंत्रिपद देत सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर कपिल पाटील यांना मंत्रिपद देत आगरी कार्ड खेळले जात आहे. रायगड, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, भिवंडी-निझामपूर महानगरपालिका, कल्याण डोंबवली महापालिकेसाठी आवश्यक आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल कल्याण डोंबिवली या भागांत आगरी समाजाचे मतदान आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचे आगरी कार्ड खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीच नवी मुंबई एअरपोर्टचा विषय घेऊन भाजपने हे काम सुरू केले आहे. वैचारीक विरोध असणारा शेकापला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे आता ठाण्यासह कोकणात मजबूत असलेला शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत या भागात आपले संपूर्ण वर्चस्व मिळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेच्या एक पद एक वृक्ष उपक्रमात आता बॅंकांचाही सहभाग

Next Post

संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे : मुख्यमंत्री

Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे : मुख्यमंत्री

संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे : मुख्यमंत्री

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group