इचलकरंजी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत दुकान उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शहरातील नगरपालिकेचे पथक दुकान बंद करण्यासाठी आले असता अनेक व्यापारी आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे काही काळ इचलकरंजीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.