पणजी : शुक्रवारी गोव्यात मुसळधार पाऊस आणि दशकांतील भीषण पुरामुळे रस्ते आणि पुल तुटून पडले आहेत, घरांचे आणि मालमत्तांचे कोट्यावधी नुकसान झाले आणि ४०० पेक्षा जास्त लोकांना तेथून हलवण्यास भाग पडले. दरड कोसळल्यामुळे आणि नदीला पूर आल्याने दोन रेल्वे गाड्याही रुळावरुन घसरल्या आहेत. उत्तर गोव्यातील सत्तारी आणि बिचोलिम आणि दक्षिण भागातील धारबंदोरासहित काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसानंतर नद्यांमधील पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. मात्र अद्याप कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “राज्यात पहिल्यांदाच या प्रकारचा पूर आला आहे. मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊनही कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दक्षिण गोव्यातील धारबंदोरा येथे एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय आहे, असे ते म्हणाले. “गोव्यात मुसळधार पाऊस पडला आहे. हा पूर्वीसारखा पाऊस नाही. लोकांच्या घरांचे आणि शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,” असे सावंत यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संततधार पावसामुळे गोव्यातील पूर परिस्थितीत लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचारपूस करण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी राज्याला पूर्ण सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.मुसळधार पावसामुळे म्हादेई (मंडोवी), चपोरा, दूधसागर, खांडेपार व वाळवंती यासह राज्यभरातील नद्यांना पूर आला आहे. उत्तर गोव्यातील सत्तारी आणि बिचोलीम आणि दक्षिण गोव्यातील धारबंदोरा येथील पाच तालुक्यातील अनेक गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.