सोलापुर : येथील देशस्थ ऋगवेदी ब्राह्मण शिक्षणोतेजक संस्थेच्या बतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा पत्रकार मनोज व्हटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरूवारी दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक संभागृहात (अॅम्फी थिएटर) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे गेल्या १९ वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक के. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याचवेळी पत्रकारातील साहित्यिक अरविंद जोशी यांचा लेखन साहित्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार असून तेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ अर्थतज्ञ व ख्यातनाम वक्ते मा. चंद्रशेखर टिळक (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचे “भारतीय अर्थव्यवस्था २०२५ आणि नंतर ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यापूवी के. अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्ये, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, रविंद्र देशमुख, संजय पाठक, विक्रम खेलबुडे, अरविंद जोशी, रेवणसिध्द जवळेकर, अश्विनी तडवळकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था २ ऑगस्ट १९३१ रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापन करण्यात आली. संस्थेतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संस्थेतर्फे वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचे मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्ध परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्ष शिबीर रम्याटी रपकम नियमित आयोजित केले
मनोज व्हटकर यांचा परिचय
मनोज नरसिंह व्हटकर हे सोलापूर येथील दिव्य मराठी दैनिकात सध्या स्पेशल करस्पोंडेंट म्हणून कार्रत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात दै. विश्व समाचार येथून झाली. गेल्या ३२ वषार्पासून ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. दै.. दिव्य मराठीत २०१२ ते २०२४ या काळात ते चीफ रिपोर्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी पॉलिटीकल रिपोटींग करतानाच गेली अनेक वर्षे विधानसभा अधिवेशन कव्हरेज केले आहे. कोवीड काळात ग्राऊंड रिपोर्टसाठी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे रिपोटींग केले आहे. दै. सकाळ मध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी जिल्हा परिषद व राजकीय विषयावर काम केले. सकाळ मधे २००८ ते २०१० या काळातही त्यानी विधानसभा अधिवेशन कव्हरेज केले आहे. २०११ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीचे कव्हरेज दै. सकाळ मध्ये त्यांनी केले आहे. दै. लोकमतमध्ये १९९७ ते २००६ या काळात राजकीय बातमीदार तसेच महापालिका आणि जिल्हा परिषद बीटचे काम केले आहे. शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत.