• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, September 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विस्तारणाऱ्या माध्यम क्षेत्रातील संधीचे सोने करा : डॉ. रवींद्र चिंचोलकर

by Yes News Marathi
November 16, 2021
in इतर घडामोडी
0
विस्तारणाऱ्या माध्यम क्षेत्रातील संधीचे सोने करा : डॉ. रवींद्र चिंचोलकर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मास कम्युनिकेशन विभागात राष्ट्रीय पत्रकारिता दिन उत्साहात साजरा

सोलापूर : माध्यमांचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. इतर क्षेत्रात नोकऱ्या कमी होत असताना विविध माध्यमांत मात्र करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागात राष्ट्रीय पत्रकारितादिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एम.ए. मास कम्युनिकेशन व बी.व्होक. जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अंबादास भासके, कु. तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक, डॉ. चैतन्य शिनखेडे हे सहायक प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ. रवींद्र चिंचोलकर पुढे म्हणाले की, लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांप्रमाणे चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत देश पिछाडीवर आहे. अगदी पाकिस्तानही वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत आपल्या पुढे आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. हे स्वातंत्र्य अनेकदा शासन व्यवस्थेकडून हिरावून घेतले जाते. १९७२मध्ये लादण्यात आलेली आणीबाणी याचे उत्तम उदाहरण आहे. हा काळ पत्रकारितेसाठी काळा कालखंड मानला जातो. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे. या न्यायिक संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा केला जातो.

यावेळी डॉ. अंबादास भासके, कु. तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, श्री. ऋषिकेश मंडलिक, डॉ. चैतन्य शिनखेडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बी.व्होक. जर्नालिझम अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी ऋतुजा जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मनमोहन भोसले यांनी केले.

Previous Post

धक्कादायक; कुंभारीजवळ प्रवासी जीपचा अपघात; चार ते पाच जण ठार

Next Post

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा

Next Post
विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group