सोलापूर स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत वैयक्तिक,सार्वजनिक शौचालय , पाणी गुणवत्ता , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या कामामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शाश्वत काम करणे हीच संत गाडगेबाबा यांना अभिवादन ठरेल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षने संत गाडगेबाबा जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर हे बोलत होते.ते म्हणाले की , जलसुरक्षक दैनंदिनीमधील माहिती अद्ययावत ठेवून सर्व जलसुरक्षक यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्नशिल रहावे असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./ पा.व स्व.) , इशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड , बांधकामचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे , जिल्हा कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार , उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक आदी उपस्थित होते.
संत गाडगे बाबा यांचे स्वच्छता विषयक कार्य अलौकिक आहे. असे सांगून सिईओ संदिप कोहिणकर यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्सात स्वच्छतेचे सातत्य टिकविणे साठी सार्वत्रिक जबाबदारी आहे.
ओडिएफ प्लस बरोबर इतर सर्व बाबी मध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवले आहे. मग ते सार्वजनिक शौचालय असो कि वैयक्तीक शौचालय असो. संस्थात्मक स्वच्छतेचे सातत्य देखील टिकवून ठेवले पाहिजे. असेही सिईओ संदिप कोहिणकर यांनी सांगितले. प्रारंभी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे म्हणाले, संत गाडगे बाबा हे केवळ स्वच्छतेपुरते सिमित नाहीत तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलन असे कि बाबांचे दशसुत्री ची प्रभावी अंमलबजावणी शासन करीत आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
यावेळी जलसुरक्षक दैनंदिनी २०२३ तसेच जल जीवन मिशन व क्षेत्रीय पाणी गुणवत्ता तपासणी संच (एफटीके ) विषयी पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले.तसेच यावेळी जिल्ह्यातील जलसुरक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून खेड ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक संतोष दारेकर , करकंब गावात शाश्वत स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविणारे स्वच्छतादूत , ज्ञानेश्वर नारायण दुधाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती बार्डी केंद्र पांढरे वाडी, तसेच रमेश खारे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली केंद्र उंबरे यांचे टीमचा गौरव करणेत आला. तसेच अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे समाजशास्त्रज्ञ आनंद मोची ,स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविणा-या मुख्याध्यापत दत्तात्रय बेदरे व सहशिक्षक विष्णू आसबे या शिक्षकांचा तसेच संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक यांचा स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व जलसुरक्षक यांनी ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलसुरक्षक दैनंदिनीच्या माध्यमातून दक्षता घ्यावी असे सांगितले तसेच यावेळी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये संत गाडगेबाबा यांच्या अस्वच्छता , अंधश्रद्धा निर्मूलन आदी कार्याचा गौरव करुन आज प्रत्येकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखा अधिकारी श्रीकांत मिरगाळे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे , संवाद तज्ञ सचिन सोनवणे , क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , पाणी गुणवत्ता तज्ञ दिपाली व्हटे , मनुष्यबळ विकास तज्ञ शंकर बंडगर , अभियांत्रिकी तज्ञ मुकूंद आकुडे , सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ यशवंती धत्तुरे , प्रतिक्षा गोडसे , अर्चना कणकी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जलसुरक्षक यांच्यासाठी दैनंदिनीचे प्रकाशन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./ पा.व स्व.) , इशाधीन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) जावेद शेख , कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड , संतोष कुलकर्णी ,नरेंद्र खराडे , उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संत गाडगेबाबा महाराज यांच्या वेशभूषेतील फुलचंद नागटिळक आदी.