येस न्युज मराठी नेटवर्क : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ही बाब निश्चितच चिंतेची आहे असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. आमची सत्ता असताना महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र मागील वर्षभरात हा क्रमांक थेट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. मुळात यातले अनेक प्रकल्पांचे एमओयूज हे आमच्या काळातच झाले आहेत. मात्र आता पुन्हा ते होत आहेत हरकत नाही महाराष्ट्रासाठी जे चांगलं होतं आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सगळ्यात मोठी चिंतेची बाब ही मागील चार वर्षात आपण पहिल्या क्रमांकाचं FDI चं राज्य केलं होतं. देशामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत सगळ्यात जास्त गुंतवणूक चारही वर्षे महाराष्ट्रात येत होती. आता आरबीआयने जे आकडेवारी घोषित केली त्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि त्याच्या मागे महाराष्ट्र आहे. ही बाब निश्चितच चिंतेची आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.