येस न्युज मराठी नेटवर्क : देशात एकीकडे कोरोना संक्रमणानं अक्राळविक्राळ रुप धारण केलं असताना राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वयाचा अभाव चिंतेचा विषय ठरतोय. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तांतरावर भाष्य केलंय.
‘तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सरकार चिंतेंचा विषय आहे का?’ असा प्रश्न गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ‘महाराष्ट्रातील करोना संक्रमणाची चिंता जरुर आहे… पण महाराष्ट्र सरकारची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करायची आहे‘, असं शहांनी म्हटलंय.