• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे

by Yes News Marathi
January 9, 2021
in मुख्य बातमी
0
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार व उत्तर प्रदेशातील वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आज महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. तसंच, जिल्हा व शहराच्या मुख्य टपाल कार्यालयाबाहेर एकत्र येत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निषेधाची पत्रेही पाठवण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. चाकणकर या पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट टपाल कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना चाकणकर यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली.

‘फक्त शहरांची नावे बदलण्यातच हे मुख्यमंत्री मश्गुल असून त्यांना महिलांच्या सुरक्षेचे काहीही घेणेदेणे नाही. लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलादेखील या राज्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. नामुष्की सहन करावी लागत आहे,’ असं चाकणकर म्हणाल्या. योगींना पाठवण्यात आलेल्या पत्रातही या सगळ्याकडं लक्ष वेधण्यात आल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

‘समस्त देशाचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीमध्ये आज सर्वात जास्त गुन्हे होतात. महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होतात हे अत्यंत खेदजनक आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट (योगी आदित्यनाथ) आहेत. गुन्हेगारांचे आणि गुन्ह्यांचे नंदनवन असलेल्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘योगी’ हे संबोधन वापरण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही, अशी टीका चाकणकर यांनी केली.

‘पीडित महिला संध्याकाळच्या वेळी एकटी गेली नसती तर ही घटना घडली नसती’ असं वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांचाही चाकणकर यांनी समाचार घेतला. ‘एक महिला असं वक्तव्य करते हे भयंकर धक्कादायक आहे. हे सगळं पाहिल्यावर या देशाला गृहमंत्री आहेत की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे प्रचारमंत्री आहेत हे कळायला मार्ग नाही. शहा हे सदासर्वकाळ कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असतात. पदाला योग्य न्याय देता येत नसेल तर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ प्रचारमंत्री म्हणून काम करावं, असा टोलाही त्यांनी हाणला.

Previous Post

करोना काळात केलेल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा केलं कौतुक

Next Post

भारतात लसीकरणाची तारीख ठरली

Next Post
भारतात लसीकरणाची तारीख ठरली

भारतात लसीकरणाची तारीख ठरली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group