इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी भारत गौरव पर्यटक रेल्वे योजनेअंतर्गत 11 रात्री 12 दिवसांची “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” या विशेष पर्यटन पॅकेजची घोषणा केली आहे. ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन यात्रा सोलापूर येथून सुरू होणार असून प्रवाशांना देशातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या प्रवासाचे पॅकेज दर प्रति व्यक्ती ₹19,900 पासून सुरू आहेत.

आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले की, ही विशेष एसी व नॉन-एसी संयुक्त भारत गौरव पर्यटक रेल्वे भाविक आणि पर्यटकांना आरामदायी व नियोजित प्रवासाचा अनुभव देईल. या यात्रेमध्ये उदयपूर, नाथद्वारा, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
या पर्यटक रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी इकॉनॉमी स्लीपर,स्टँडर्ड 3 एसी आणि कम्फर्ट 2 एसी श्रेणी उपलब्ध असून सुमारे 750 प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बोर्डिंग आणि डिबोर्डिंग सुविधा सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवर उपलब्ध राहणार आहे.
या सर्वसमावेशक पर्यटन पॅकेजमध्ये खालील सुविधा समाविष्ट आहेत:
एसी आणि नॉन-एसी डब्यांमधून रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये डबल, ट्रिपल व क्वाड शेअरिंगवर निवास व्यवस्था, संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन, एसी व नॉन-एसी वाहनांद्वारे स्थानिक पर्यटन व ट्रान्सफर व्यवस्था, सर्वसमावेशक प्रवास विमा सुविधा आणि प्रवासादरम्यान समन्वयासाठी आयआरसीटीसी टूर मॅनेजर सेवा
आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की प्रवाशांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
“डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” या पॅकेजचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
- इकॉनॉमी क्लास – ₹19,900 प्रति व्यक्ती
- स्टँडर्ड 3 एसी – ₹31,920 प्रति व्यक्ती
- कम्फर्ट 2 एसी – ₹41,840 प्रति व्यक्ती
या यात्रेचे बुकिंग पहिले येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर आयआरसीटीसीच्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळावर सुरू आहे. अधिक माहितीसाठी प्रवासी मोबाईल क्रमांक 8287931886 वर संपर्क साधू शकतात किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क करू शकतात.
ही योजना देशातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच प्रादेशिक रेल्वे संपर्क अधिक मजबूत करणार असून प्रवाशांना अविस्मरणीय धार्मिक पर्यटन अनुभव देणार आहे.

