• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारताच्या महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावले दूर

by Yes News Marathi
August 2, 2021
in इतर घडामोडी
0
भारताच्या महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावले दूर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टोकियो : भारताच्या महिला हॉकी संघाने आज इतिहास रचला. भारताने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव केला. पण या पराभवाबरोबर भारताच्या संघाने इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर सुवर्णपदकापासून आता फक्त दोन पावले दूर आहे.

भारताच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत एकदाही प्रवेश केलेला नव्हता. भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता, त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत १९८०, २०१६ आणि आता २०२१-२२ या तीन ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रवेश केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण यावेळी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या गुरजित कौरने हा गोल केला होता.
पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताच्या मोनिका मलिकला यावेळी ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली. पण त्यानंतरही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यामुळे यापुढच्या ३० मिनिटांच्या खेळावर भारतीय संघ इतिहास घडणार की नाही, हे अवलंबून होते. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली .

Previous Post

सुरज सुरवसे दोन वर्षांसाठी तडीपार….

Next Post

दुकानांच्या वेळा रात्री आठपर्यंत वाढवणार : उद्धव ठाकरे

Next Post
दुकानांच्या वेळा रात्री आठपर्यंत वाढवणार : उद्धव ठाकरे

दुकानांच्या वेळा रात्री आठपर्यंत वाढवणार : उद्धव ठाकरे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group