मुंबई : राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागानं माहिती दिली आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव भागातून मान्सून माघारी फिरण्यास पुढील दोन ते तीन दिवसात अनुकूल वातावरण आहे.
राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील काही भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे.