सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून दोन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशन मार्गे विजापूर रोड आणि बाजार समिती ते अशोक चौक पोलीस चौकी मार्गे पत्रकार भवन असे हे दोन प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. आजवर मंत्री तसेच विविध अधिकाऱ्यांनी डझनावर बैठका घेतल्या. भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाने चार वेळा टेंडर काढले. मात्र महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची 100 टक्के जागा एन एच आय कडे हस्तांतरित न झाल्यामुळे अद्याप हे काम रखडले आहे. भूसंपादनापोटी महापालिकेने सुमारे 60 ते 70 कोटी उड्डाणपूलांसाठी खर्च झाले आहेत.जर हे दोन्ही उड्डाणपूल झाले तर यासाठी सोलापूरकरांना टोल द्यावा लागणार आहे. अगोदरच सोलापुरात एमएसआरडीसी च्या माध्यमातून केलेल्या 38 किलोमीटर रस्त्यासाठी बार्शी, अक्कलकोट नाका,सिद्धेश्वर साखर कारखाना आणि देगाव या चार ठिकाणी टोल द्यावा लागत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील एनएचआयचे दोन उड्डाणपूल झाले तर पुन्हा शहरवासीयांना टोलचा भार सोसावा लागणार आहे. त्यामुळे हे उड्डाणपूल हवेत की नको याबाबत शहरवासीयांनी येस न्यूज मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी.

