• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 5, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना रोमांचित झालो : मोदी

by Yes News Marathi
July 25, 2021
in इतर घडामोडी
0
ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना रोमांचित झालो : मोदी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे अभिनंदन केले . ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना बघून रोमांचित झालो. खेळाडूंचा उत्साह वाढवण गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण करोना अजूनही गलेला नाही. यामुळे कुठलाही उत्सव असो की कार्यक्रम यावेळी करोनाच्या नियमांच पालन करणे विसरू नका, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी स्वतंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण केले जात आहे. यामुळे १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नक्की म्हणा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ या मंत्रासह आपल्याला पुढे जायचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.१५ ऑगस्टला यंदा राष्ट्रगीताशी संबंधित एक प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रगीत म्हणावे . यासाठी एक वेबसाइटही बनवण्यात आली आहे. राष्ट्रगानडॉइन. स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरे करत असताना १२ मार्चला साबरमती आश्रमातून ‘अमृत महोत्सव’ला सुरवात करण्यात आली होती. या दिवशी गांधीजींच्या दांडी यात्रेचे स्मरण केले गेले.उद्या २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलची लढाई भारतीय सैन्याचे शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. संपूर्ण जग याचा साक्षी आहे. यावेळी हा ‘कारगिल विजय दिवस ‘अमृत महोत्सवा’दरम्यान साजरा होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.’मन की बात’ मध्ये मांडले जाणारे ७५ टक्के विचार आणि संशोधन हे ३५ वर्षांखाली तरुणांचे आहेत. एक प्रकारे ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातील तरुण चालवत आहेत. ‘मन की बात’ हा त्यांच्या सकारात्मक विचारांचे आणि संवेदनशीलचे माध्यम आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले .

Previous Post

सांगलीत पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम

Next Post

योगसाधना मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी

Next Post
योगसाधना मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी

योगसाधना मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group