येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून एक मेपर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. आता संचार बंदी संपण्याचा कालावधी अवघ्या दोन दिवसावर आल्यामुळे पुन्हा राज्यात संचार बंदी लावली जाणार का आणि ती किती दिवसाची असेल याची उत्सुकता आता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. वास्तविक पाहता दररोज महाराष्ट्रात 60 हजारच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमेडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा तसेच विविध हॉस्पिटलमध्ये बेडचा तुटवडा यामुळे कोरोनाचे टेन्शन कायम आहे त्यामुळे २ मे नंतर देखील महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेलच असे चित्र सध्या दिसत आहे. आज मंत्रिमंडळाची दुपारी बैठक होणार असून यामध्ये यावर शिक्कामोर्तब होईल.