नेपियर: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा टी 20 सामना पावसामुळे मध्यावरच थांबवावा लागला. पावसाने या मॅचमध्ये व्यत्यय आणला. डकवर्थ लुईस नियमानुसार ही मॅच टाय झाली. टीम इंडियाने तीन टी 20 सामन्याची सीरीज 1-0 ने जिंकली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने 65 धावांनी जिंकला होता.
आज न्यूझीलंडची टीम 160 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना 9 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दुसरी टी 20 सीरीज जिंकली आहे. याआधी आयर्लंड विरुद्ध सीरीज जिंकली होती.