ठाणे ही सुरेल नगरी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात आहेत. वाढतेय. माझा ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस ही संख्या वाढतेय याचा आनंद होतो.’ असे उद्गार पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे उद्गार यांनी काढले. ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अशी माहिती गोरखनाथ जाधव यांनी माहिती दिली.

रसिकप्रेमींसाठी ठाण्यात ‘स्वर प्रभात’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व पार पडले. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े. ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट व पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
अभिजात संगीतात विविध उपक्रम राबवणारी अग्रगणी संस्था गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील टाऊन हॉल अॅम्पिथिएटर येथे ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित विवेक सोनार यांच्या हस्ते गुरूकुल प्रतिष्ठान ची मनाची, राष्ट्रीय पातळी वरील पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीत शिष्यवृत्ती, भारतातील गुणवंत निवडक ८ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात ठाण्याचा साईराज नवले, जळगावचा अजय सोनावणे, कोलकात्याचे सोहांग डे, अनीष पाल, सोलापूरचा मयुरेश जाधव, मुंबईची खुषी चौगुले, आणि चाळीसगावचे युवराज सोनार सिद्धेश खैरनार या भारतातील आठ संगीत साधक विद्यार्थ्यांना एकूण पाच लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
मयुरेश गोरखनाथ जाधव गुरुवर्य पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे परंतन्डु पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची 5 वी पिढीचे सुंद्रीवादक माद्यमातून सुंद्री वाद्याचा जतन संवर्धन करत आहे.