आंधळी – तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत उत्साहात स्वागत करण्यात आले.२०२५/२६ साठी नवीन प्रवेशोत्सव करण्यात आलेल्या तिथल्या नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.विविध रंगी रांगोळ्या, पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचा सहभाग, शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षरोपण शाळेच्या पहिल्या दिवशी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेली शाळेच्या दारात उभारलेली गुढी असे शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
शाळेचा पहिला दिवस साजरा करताना मुलांचे चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी मा.जि.प.सदस्य अर्जुन (तात्या)काळे,मा.जि.प.सदस्य,डी. एस काळे, आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे, संतोष काळे, जि.प.सातारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि. प.सातारा अमर नलावडे, जि. प.सातारा शिक्षणाधिकारी (योजना) अनिस नायकवडी,पंचायत समिती, माण गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे,सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण विजयकुमार कोकरे, पंचायत समिती, माण गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख, केंद्र -आंधळी साधना झणझणे ,मुख्याध्यापक घनशाम काळे, उपशिक्षक सुप्रिया चिरमे,माया वरकड ,विजय गोरे , पल्लवी गोरे , पालक, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#schoolfirstday



