कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी कमी झाल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केवळ पेट्रोल-डिझेल, ऑक्सिजन टँकर यांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
चार दिवसांनंतर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुलाअद्याप महामार्गावर दीड फूट पाणी -गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील पाणी कमी झाल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केवळ पेट्रोल-डिझेल, ऑक्सिजन टँकर यांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान महामार्गावर अद्यापही दीड फूट पाणी असल्याने चार चाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनास बंदी आहे. सायंकाळी पाणी कमी झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.