सांगली : अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे भाज्यांची आवक घटल्याने वांग्याने शंभरी पार केली असून वांग्याची भाजी ताटात असणे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे वांग्यावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून झाडावर असलेली वांगी किडली आहेत. तशातच गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने वांग्याचे उत्पादनही घटले आहे. याच बरोबर टोमॅटोचे पीकही पावसात सापडल्याने खराब झाले असून बाजारात टोमॅटो, वांगी या फळभाज्या दुर्मीळ झाल्या आहेत. कांदा पात, तांदळ, पालक जुडीचे दर पंधरा ते वीस रुपयांवर गेले आहेत. या तुलनेत पन्नास ते ऐंशी रुपयांवर गेलेल्या र्कोंथबीरचे दर उतरले असून दहा रुपयांपर्यंत खाली आले आहेत.