येस न्युज मराठी नेटवर्क । राज्य सरकारचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यातील संबंधितांवर कारवाई व्हावी अशी भाजपची मागणी आहे तसेच ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात झाला आहे, त्यामुळे तुम्ही काही केले नाही तर घाबरता कशाला असा प्रश्न माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते.मात्र आपण काहि केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही.भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही.काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे.अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर हून आंबोली मार्गे गोव्याला जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यावेळी त्यांचे भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,अतुल काळसेकर,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,उपसभापती शितल राऊळ,व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.